मुंबई इंडियन्सला आता आयपीएलमध्ये ही गोष्ट करताच येणार नाही, दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर मोठा धक्का


शारजा : मुंबई इंडियन्सच्या संघाला आज दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघाला या आयपीएमलध्ये एक गोष्ट आता करताच येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाचे ११ सामने झाले होते, या ११ सामन्यांमध्ये मुंबईला पाच विजय मिळवता आले होते तर त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे १० गुणांसह ते सहाव्या स्थानावर होते. या पराभवानंतरही त्यांचे १० गुणच आहे आणि ते सहाव्या स्थानावरच आहे. पण आजचा सामना जर मुंबई इंडियन्सचा संघ जिंकला असता तर त्यांना १२ गुणांसह चौथ्या स्थानावर जाण्याची चांगली संधी होती, पण ही संधी मुंबई इंडियन्सने गमावली. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला या आयपीएलमध्ये आता १६ गुण पटकावता येणारच नाही, ही गोष्टही स्पष्ट झाली आहे.

या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाने ११ सामन्यांमध्ये आठ विजय मिळवले होते, सहा लढतींमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे ते १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होते. या विजयानंतर दिल्लीचे १८ गुण झाले आहेत आणि तेच दुसऱ्याच स्थानावर कायम आहेत.

आजच्या सामन्यात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे फलंदाज अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक ३३ धावा या सूर्यकुमार यादवने केल्या. पण रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायन पोलार्ड आज अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईच्या संघाला १२९ धावाच करता आल्या. दुसरीकडे दिल्लीच्या संघाडूनही यावेळी धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळाली नाही, कारण त्यांना अखेरच्या काही षटकांपर्यंत विजयाची वाट पाहावी लागली. पण श्रेयस अय्यर आणि त्यानंतर आर. अश्विन यांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. अश्विनने यावेळी षटकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचे पाहायला मिळाले. या विजयासह दिल्लीने आपले प्ले-ऑफमधील स्थान बनवले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: