piyush goyal : ‘काही फायद्यांसाठी काँग्रेस आपलीच सरकारे अस्थिर आणि राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करतेय’
नवी दिल्लीः पंजाब काँग्रेसमधील राजकीय पेचावर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. काही फायद्यासाठी राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड केल्याचा आरोप पियूष गोयल यांनी केला. काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय हितांशी तडजोड करत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपसाठी राष्ट्रीय सुरक्षा सर्वप्रथम आहे, असं गोयल म्हणाले. रविवारी ते दुबईत बोलत होते.
navjot singh sidhu : ‘संपूर्ण काँग्रेस नवज्योत सिंग सिद्धूंच्या कॉमेडीत रंगलीय’
पंजाब काँग्रेसमध्ये जे काही घडतंय त्यावरून मी खूप चिंतेत आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षा आमच्यासाठी प्रथम आहे. सर्व प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी आपण येतो. आम्ही या तत्त्वावर काम करतो. पंतप्रधान मोदींच सरकार आणि भाजप याच विचाराने काम करतं, असं पियूष गोयल म्हणाले.