piyush goyal : ‘काही फायद्यांसाठी काँग्रेस आपलीच सरकारे अस्थिर आणि राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करतेय’


नवी दिल्लीः पंजाब काँग्रेसमधील राजकीय पेचावर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. काही फायद्यासाठी राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड केल्याचा आरोप पियूष गोयल यांनी केला. काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय हितांशी तडजोड करत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपसाठी राष्ट्रीय सुरक्षा सर्वप्रथम आहे, असं गोयल म्हणाले. रविवारी ते दुबईत बोलत होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विटद्वारे सतत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यावरून गोयल यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेस पक्ष राहुल गांधींना गांभीर्याने कधीच घेत नाही. आपल्याच सरकारांना काँग्रेस नेतृत्व रोज अस्थिर करत आहे. काँग्रेस नेतृत्व राष्ट्रीय चिंतांपासून तुटले आहे. राजकीय निर्णय घेताने राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करेल, अशी आपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

navjot singh sidhu : ‘संपूर्ण काँग्रेस नवज्योत सिंग सिद्धूंच्या कॉमेडीत रंगलीय’

पंजाब काँग्रेसमध्ये जे काही घडतंय त्यावरून मी खूप चिंतेत आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षा आमच्यासाठी प्रथम आहे. सर्व प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी आपण येतो. आम्ही या तत्त्वावर काम करतो. पंतप्रधान मोदींच सरकार आणि भाजप याच विचाराने काम करतं, असं पियूष गोयल म्हणाले.

bhupesh baghel : मुख्यमंत्री बघेल यांच्या वक्तव्याने खळबळ! म्हणाले, ‘छत्तीसगडचा ‘पंजाब’ कधीच होणार नाही’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: