महिला आशिया चषक 19 जुलैपासून सुरू होणार आहे.भारत आपल्या मोहिमेची सुरुवात शुक्रवारी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने करेल. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत वर्चस्व गाजवत चार पैकी तीन टी-20 आणि 50 षटकांच्या फॉरमॅटमधील चारही विजेतेपदे जिंकली आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. स्मृती मंधानाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक) या स्टार महिला खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. मुख्य संघातील 15 खेळाडूंशिवाय श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.भारताने महिला आशिया कप टी-20 स्पर्धेत 20 पैकी 17 सामने जिंकले आहेत.भारताने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या 14 सामन्यांमध्ये 11 विजय नोंदवले आहेत.
स्मृती मंधानाचा उत्कृष्ट फॉर्म आहे आणि अलीकडेच गोलंदाजांनी एक युनिट म्हणून चांगली कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांत आठ विकेट घेतल्या तर फिरकीपटू राधा यादवलाही यश मिळाले आहे. फिरकीपटूंमध्ये दीप्ती शर्मा, सजीवन सजना आणि श्रेयंका पाटील यांचा समावेश आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य 11 खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत:
भारत: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, सजीवन सजना, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, उमा छेत्री, पूजा वस्त्राकर, राधा यादव, अरुंधती रेड्डी.
पाकिस्तान : सिद्रा अमीन, ओमामा सोहेल, इरम जावेद, निदा दार, आलिया रियाझ, फातिमा सना, गुल फिरोजा, मुनिबा अली, डायना बेग, सादिया इक्बाल, नशरा संधू.
Edited by – Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.