महाबोधी महाविहार मुक्तीसाठी येत्या 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत आझाद मैदानात सर्व आंबेडकरी बौद्ध जनतेचा विराट मोर्चा
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२५ – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या आजही ताब्यात नाही. ज्या कर्मकांड पिंडदानाला अंधश्रद्धेला भगवान बुद्धांनी विरोध केला ते प्रकार महाबोधी महाविहार परिसरात होत असल्याने बौद्धांच्या भावना दुखावल्या जात आहेत.महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट मध्ये चार हिंदू चार बौद्ध आणि कलेक्टर चेअरमन असतात. महाबोधी महाविहार पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात नाही.त्यामुळे महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा 1949 ज्याला बीटी ऍक्ट म्हटले जाते तो रद्द झाला पाहिजे. भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले असून त्यापूर्वीचा 1949 चा बिहार विधान सभेचा बीटी ऍक्ट रद्द झाला पाहिजे. महाबोधी महाविहार ट्रस्ट मधील सर्व 9 सदस्य आणि चेअरमन हे बौद्ध असले पाहिजेत.प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ त्या त्या धर्माच्या ट्रस्टकडे असतात. हिंदू मंदिरात हिंदू ट्रस्टी, मुस्लिमांच्या दर्गा मशीद मध्ये मुस्लिम ट्रस्टी,शिखांच्या गुरुद्वारात शीख ट्रस्टी मग बौद्धांचे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही ? बौद्धांच्या महाबोधी बुद्धविहार ट्रस्टमध्ये बौद्ध ट्रस्टी का नको ? महाबोधी महाविहार बौद्धांचे असून त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांचे असले पाहिजे.महाबोधी महाविहार इतरांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे.या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गट सर्व बौद्ध आंबेडकरी संघटना,सर्व पक्षीय बौद्ध नेते एकत्र आले असून येत्या 14 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे शांततापूर्ण विराट रॅली आयोजित करण्यात आली आहे.

या रॅलीत प्रचंड संख्येने सर्व बौद्ध आंबेडकरी जनतेने ताकदीने सहभागी व्हावे असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या एकजुटीचे निमंत्रक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.या पत्रकार परिषदेस महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी एकत्रित आलेले विविध पक्षांचे अनेक बौद्ध नेते,विविध रिपब्लिकन गटांचे नेते उपस्थित होते.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चा ची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,प्रा.जोगेंद्र कवाडे,डॉ राजेंद्र गवई, नानासाहेब इंदिसे,खासदार वर्षाताई गायकवाड,खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार संजय बनसोडे, राजू वाघमारे, अविनाश महातेकर,गौतम सोनवणे; तानसेन ननावरे,जयदीप कवाडे,विलास रूपवते,मिलिंद सुर्वे,नितीन मोरे,सिद्धार्थ कासारे आदी मान्यवरांसह महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती चे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीचे निमंत्रक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,पीपल्स रिपब्लिकन चे प्रा.जोगेंद्र कवाडे,रिपाइं गवई गटाचे डॉ राजेंद्र गवई, रिपाइं एकतावादी चे नानासाहेब इंदिसे,बीआरएसपी चे ॲड सुरेश माने, दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे चंद्रबोधी पाटील, काँग्रेस चे नितीन राऊत, खासदार चंद्रकांत हंडोरे,खासदार वर्षाताई गायकवाड, शिवसेने चे नेते कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट, आ.संजय बनसोडे,आ.राजकुमार बडोले,देशक खोब्रागडे, सुलेखाताई कुंभारे, अर्जुन डांगळे,जयदेव गायकवाड,अक्षय आंबेडकर; जयदीप कवाडे; अविनाश महातेकर; राजू वाघमारे; राम पंडागळे;भाई गिरकर ; पद्मश्री कल्पना सरोज; दीपक निकाळजे; दैनिक सम्राट चे संपादक कुणाल बबन कांबळे; दलित पँथर चे बुद्धभूषण गोटे; दलित पँथर सेना चे दीपक केदार; पँथर्स रिपाइं चे सिद्धांत गाडे; भीम आर्मी चे अशोक कांबळे; सुनील डोंगरे; तानसेन ननावरे; काकासाहेब खंबाळकर; दिलीप जगताप; सुनील निर्भवने; सुरेश केदारे; जय भीम आर्मी चे नितीन मोरे; दलित पँथर चे बाळासाहेब पडवळ;,मिलिंद सुर्वे; विलास रूपवते ; रवी गरुड; जयमंगल धनराज; अनिकेत संसारे; व्ही एस मोकळे; गगन मलिक, विठोबा पवार;ॲड दिलीप काकडे; कनिष्क टी कांबळे; जय मंगल धनराज; सुनील रामटेके; एन के कांबळे; सुनील वाघपंजे; वी ल मोहिते,नागसेन कांबळे; लक्ष्मण भगत,रिपब्लिकन पक्षाचे गौतम सोनवणे; सिद्धार्थ कासारे सुरेश बार्शिंग; घनश्याम चिरणकर; प्रकाश मोरे; चंद्रशेखर कांबळे; दादासाहेब मर्चंडे,आदी सर्व रिपब्लिकन गट; बौद्ध धार्मिक संघटना आणि सर्व पक्षातील बौद्ध नेते यांचा या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती मध्ये समावेश आहे.तसेच या समितीमध्ये बौद्ध भंते विनाचार्य, आकाश लामा,पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो, भदंत विरत्न थेरो,भंते हर्षबोधी; भदंत बोधिशील,भदंत शांतिरत्न,भंते विनय बोधी महाथेरो,भदंत लामा आदी मान्यवरांसह सर्व बौद्ध संघटना आणि रिपब्लिकन गटांचे प्रतिनिधी या कृती समितिमध्ये आहेत.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी 14 ऑक्टोबर ही तारीख सर्वानुमते ठरवण्यात आली आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेऊन या देशात धम्मचक्र प्रवर्तित केले.त्यामुळे 14 ऑक्टोबर ही तारीख धम्मासाठी योगदान देण्याची तारीख असून येत्या 14 ऑक्टोबर रोजी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आझाद मैदान येथे शांततापूर्ण विराट रॅली आयोजित करण्यात आली आहे.एक दिवस धम्मासाठी देऊया आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी यंदा 14 ऑक्टोबर मुंबईत जाऊया असा निर्धार करून मुंबई ठाणे रायगड नाशिक पालघर सह राज्यभरातील बौद्ध आंबेडकरी जनतेने या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि सर्व आंबेडकरी बौद्ध नेत्यांनी केले आहे.