‘भाजपमध्ये मस्त निवांत आहे, चौकशी वगैरे काही नाही, शांत झोप लागते’


हायलाइट्स:

  • मावळमधील जाहीर कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांचं सूचक वक्तव्य
  • हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यामुळं भाजपची गोची
  • ईडी, सीबीआय चौकशीच्या संदर्भात केलं वक्तव्य

पुणे: ‘भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही…’ हे वक्तव्य आहे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचं. मावळमधील (Maval) एका कार्यक्रमात त्यांनी गंमतीनं हे वक्तव्य केलेलं असलं तरी त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार आल्यापासून सत्ताधारी मंत्री व नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स अशा केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. रोजच्या रोज छाप्यांच्या व समन्सच्या बातम्या येत आहेत. बहुतेक सर्व कारवाया केवळ महाविकास आघाडीशी संबंधित नेत्यांवर होत आहेत. भाजपशी संबंधित कोणालाही समन्स धाडलं गेल्याचं किंवा त्यांची चौकशी झाल्याचं गेल्या दीड वर्षांत क्वचितच पाहायला मिळालं आहे. सत्ताधारी आघाडीतील तिन्ही पक्ष सातत्यानं हा आरोप करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आरोपांना एकप्रकारे बळकटी मिळाली आहे.

वाचा:बिबवेवाडी खून प्रकरणातील मुख्य आरोपी स्वत:हून पोलिसांसमोर हजर

विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांना पक्षांतर करावं लागलं होतं. हर्षवर्धन पाटील काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तर, मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले. कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावर बसलेल्या एका नेत्यांना त्यांंना खासगीत याबाबत विचारलं. आपल्या भाषणात त्यांनी हा किस्सा जाहीरपणे सांगितला. ‘आम्हालाही भाजपमध्ये जावं लागलं. तो निर्णय मी का घेतला तेवढं मला विचारू नका. ते काँग्रेसच्या नेत्यांना विचारा, असं ते म्हणाले. ‘पण आता भाजपमध्ये मी निवांत आहे. शांत झोप लागते. चौकशी नाही, फिवकशी नाही, काही नाही,’ अशी मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हंशा पिकला.

वाचा: पुण्यातील जनता वसाहतीमध्ये खळबळ; दगडाने ठेचून एकाचा खून



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: