बांगलादेश विरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, मयंकचा समावेश

[ad_1]

India vs Bangladesh
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बांगलादेश विरुद्ध आगामी तीन T20 सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 

इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) च्या शेवटच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्ससाठी प्रसिद्धी मिळवणारा वेगवान गोलंदाज मयंक यादवचा वेग आणि अचूकतेमुळे प्रथमच राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला. इशान किशनला टी-20 संघात स्थान मिळाले नाही 

फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि यष्टीरक्षक जितेश शर्मा यांचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाची यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसनला पहिली पसंती मिळू शकते.

 

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये, दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आणि तिसरा सामना 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल. तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवले जातील.

 

बांगलादेश विरुद्ध भारतीय टी-२० संघ

सूर्य कुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव. 

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top