सांगलीतील शिक्षकाची कमाल; महिलांच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या यंत्राची सगळीकडेच चर्चा!


हायलाइट्स:

  • सांगलीतील शिक्षकाने तयार केलं अनोखं यंत्र
  • महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी होणार मदत
  • रोबोच्या यशस्वी प्रयोगानंतर शिक्षकाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी रक्षक यंत्र

सांगली : देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर संकट काळात महिलांच्या मदतीला येणारे रक्षक यंत्र सांगलीतील एका प्राध्यापकाने तयार केलं आहे. संकटाची चाहूल लागताच या यंत्राचे एक बटन दाबताच संबंधित तरुणीच्या घरी आणि परिसरातील पोलीस ठाण्यात सलग फोन लागतात. या यंत्रामुळे संकटात सापडलेल्या तरूणीच्या मदतीला पोलीस तातडीने पोहोचू शकतात. सांगलीच्या वालचंद कॉलेजमधील प्रा. आरिफ शेख यांनी रक्षक यंत्र तयार केलं आहे.

मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या मनात सतत असुरक्षिततेची भावना असते. महिलांच्या सुरक्षेसाठी सांगलीतील प्रा. आरिफ शेख यांनी अत्याधुनिक इंटरनेट यंत्रणेद्वारे एक डिव्हाईस तयार केलं. एखाद्या महिलेवर किंवा तरुणीवर कठीण प्रसंग ओढवला तर, या डिव्हाईसमधील एक बटण दाबताच ते अ‍ॅक्टिव्ह मोडवर जाते.

चिपी विमानतळ उद्घाटन: निमंत्रण पत्रिकेत नारायण राणेंचे नाव कितव्या क्रमांकावर?

या डिव्हाईसमध्ये दोन आयओटी नोड्स वापरले आहेत. एक नोड पोलिसांच्या पथकांशी कनेक्ट असतो. त्याद्वारे परिसरातील पोलीस ठाण्यात फोन जातो. दुसरे नोड रक्षक यंत्र वापरणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांशी जोडलेलं असतं. याद्वारे महिलेच्या कुटुंबियांना फोन जातो. ज्या ठिकाणाहून फोन जाईल, त्याचे जीपीएस लोकेशन थेट पोलिसांना मिळेल. त्यामुळे पोलिसांना त्याठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होते. एकदा चार्ज केल्यानंतर हे यंत्र सहा ते सात तास चालते, अशी माहिती शेख यांनी दिली.

प्रा. आरिफ शेख यांनी यापूर्वी करोना रुग्णांच्या सेवेसाठी एका रोबोटची निर्मिती केली होती. तो रोबो मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णांना औषधे देण्याचे काम सध्या करत आहे. रोबोच्या यशस्वी प्रयोगानंतर प्रा. शेख यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी रक्षक यंत्र बनवलं आहे. शेख यांच्या या अनोख्या प्रयोगामुळे महिलांच्या संरक्षणासाठी मदत होणार आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी रक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक पाहिले. याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी त्यांनी प्रा. शेख यांना बोलावलं आहे. सरकारी पातळीवरील प्रयत्नातून रक्षक यंत्र महिलांपर्यंत पोहोचल्यास महिलांच्या सुरक्षेसाठी मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: