Himachal Pradesh: ‘खंमीगर ग्लेशिअर’मध्ये अडकून पडलेल्या ट्रेकर्सची अखेर सुटका


हायलाइट्स:

  • दोन मृतदेहांसहीत आयटीबीपी जवानांचा २७ किलोमीटर पायी प्रवास
  • मृतदेह काझा प्रशासनाच्या ताब्यात सोपवले
  • थंडीत गारठून दोघ ट्रेकर्सनं आपले जीव गमावले, तर १४ जण अडकून पडले होते

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील ‘लाहौल स्पीती‘ भागातील ‘खंमीगर ग्लेशिअर‘मध्ये अडकून पडलेल्या ट्रेकर्स आणि पोर्टरना आयटीबीपी जवानांची मदत उपलब्ध झालीय. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या गटानं तब्बल २७ किलोमीटरचा कच्चा रस्ता पायी तुडवत स्ट्रेचरवरून दोन ट्रेकर्सचे मृतदेह काझापर्यंत आणण्यात यश मिळवलंय. दुर्गम भागात ट्रेकिंगसाठी गेले असताना थंडीमुळे मदत पोहचण्यापूर्वीच खंमीगर ग्लेशिअरजवळ या दोघांचा मृत्यू झाला होता. तसंच मोहीम पूर्ण करत तब्बल १५ जणांना रेस्क्यू करण्यात बचाव पथकाला यश मिळवलं आहे.

आयटीबीपी जवानांनी दोन्ही मृतदेह काझा प्रशासनाकडे सोपवले आहेत. तर रेस्क्यू करण्यात आलेल्या चार पोर्टरना काझाच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

Kahnmigar Glacier: ‘लाहौल-स्पीती’नजिक खंमीगर ग्लेशिअरमध्ये १४ ट्रेकर्स अडकले; थंडीनं दोघांचा मृत्यू
India China: चिनी सैनी उत्तराखंडात घुसले… पूल उद्ध्वस्त केला आणि निघून गेले!

आयटीबीपीच्या १७ व्या बटालियनच्या जवानांनी हे मृतदेह खंमीगर ग्लेशिअर जवळच्या भागातून ताब्यात घेतले. या भागात हेलिकॉप्टर पोहचण्याची सुविधा नसल्यानं स्ट्रेचरवर हे मृतदेह बांधून तब्बल २७ किलोमीटरचा प्रवास जवानांनी पायी केला.

‘इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशन, पश्चिम बंगाल’चा सहा सदस्यीय गट ‘बातल’हून – ‘खंमीगर ग्लेशिअर’ – ‘काजा’ या मार्गावर ट्रेकिंगसाठी रवाना झाला होता. खंमीगर ग्लेशिअर जमिनीपासून जवळपास ५०३४ मीटर उंचीवर आहे. या दलासोबत ११ पोर्टर (सामान उचलण्यासाठी आणि मदतीसाठी माणसं) आणि एक स्थानिक गाईड (शेरपा) हेदेखील सहभागी झाले होते. परंतु, अचानक मोठी बर्फवृष्टी झाल्यानंतर हे सगळे जण खंमीगर ग्लेशिअर भागात अडकून पडले होते. प्रचंड थंडीत निभाव न लागल्यानं पश्चिम बंगालचे रहिवासी भास्कर देव (६१ वर्ष) आणि संदीप कुमार ठाकुरता (३८ वर्ष) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या ट्रेकिंग गटातील एका ट्रेकरनं एका पोर्टरसोबत ‘काजा’ गाठून या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. त्यानंतर या टीमच्या मदतीसाठी तातडीनं आयटीबीपी, भारतीय लष्कर आणि नागरी प्रशासनाची एक संयुक्त टीम २८ सप्टेंबर रोजी काझाहून रवाना झाली होती.

UP Police: उत्तर प्रदेशात पोलिसांच्या मारहाणीनंतर व्यावसायिकाचा मृत्यू, आरोपी फरार
Manish Gupta Murder Case: यूपीत व्यापाऱ्यांमध्ये असंतोष; योगींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: